सस्नेह जय शिवराय नितेश पाटील ९६३७१३८०३१
भिमाशंकर पदभ्रमण trek २१/२२/२३.०८.२०१५
भिमाशंकर पदभ्रमण trek २१/२२/२३.०८.२०१५
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’.निसर्ग सौंदर्याने नटलेलं...
सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले . . निसर्गातील डोंगराच्या जाळ्यात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच डोंगरयात्री ग्रुप मुंबई च्या सहयोगाने योग आला त्या विषयी......
सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले . . निसर्गातील डोंगराच्या जाळ्यात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच डोंगरयात्री ग्रुप मुंबई च्या सहयोगाने योग आला त्या विषयी......
निसर्गाने
नटलेल्या महाकाय अश्या अरण्यातुन खास करुन पावसाळ्यात पदभ्रमण करीत जाणे
हा वेगळाच अणुभव. चहुबाजुनी जर्द झाडांची दाटी,पक्षांचा तो सुमघुर आवाज,
झाडांच्या पाणांचा सळसळनारा आवाज,झाडांवर पडनारया पावसाचा आवाज,मघुनच
अदृष्य झर्याचा आवाज, उत्सुकता होतीच, आणि ठरलेही होते दोन दिवसांचा
कार्यक्रम ठरल्याप्रमाणे शुक्रवार दि. २१.०८.२०१५ रात्री पालघरहून आम्ही ५
जन ९.२० च्या विरार लोकलने रवाना झालो.आम्ही सारे नविन होतो परेश तितका
त्या समुहाबरोबर भ्रमंती साठी जात असे.विरार वरुन १०.०८ च्या लोकलने आम्ही
दादरला गेलो दादर हुन ११.३१ च्या छत्रपती शिवाजी टर्मिनल लोकलने तिथे
पोहचलो.समुहातील काहीजन (एकुण१७)छत्रपती शिवाजी टर्मीनलाच जमले होते.काही
पुढच्या स्थानकावरुन बसनार होते आम्हाला १२.३० शेवटच्या कर्जत लोकलने जायचे
होते.
आम्ही टकळत लोकलची वाट बघत होतो
तितक्यात एक २५शीतील नवतरुण जोडपं आमच्याजवळ येऊन ऊभं राहीलं आता माणसाचा
स्वभाव कसा हे सांगायची गरज नाही.अन् मधेच एकजन बरळला की एक आली तिही
प्रोटक्शन घेऊन .तो त्या व्यक्तीचा दोष नाहीये.कस असतं ना आपण छान स्वयंपाक
बनवला आणि त्यात जर मिठच नसेल तर त्या जेवनाला काही चव असेल का ? तुम्ही
फक्त मिठ खाऊ शकत नाही, पण ते चवीसाठी हव असतं त्यातलाच हा
प्रकार.असो.......
लोकल येताच आम्ही लगबगीने बसलो लोकल चालु होताच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि निघालो
लोकलमधे आम्हाला सोडायला आलेली ४०शीतील एक व्यक्ती ( प्रशांत म्हात्रे)आमचं तोंड गोड करण्यासाठी चक्क काजुकतरी घेऊन आलेले. आम्हा सर्वाना प्रवासासाठी शुभेच्छा देऊन ते दादरला उतरले. चर्चासत्रात तिन कसे वाजले कळले नाही.आणि पहाटे ३ वाजता कर्जतला लोकल येऊन पोहचली.सारे जण ऊतरलो पाहता पाहता ४१जणाचां समुह तयार झाला.विषेश म्हणजे आमच्यात ७ वर्षाची चिमुकली आर्या होती. मनात विचार आला ही ईवलासी चिमुकली कशी बरं चढनार? हिच्या आईबाबानी का बरं आणलं असावं हिला? मुसळधार पाऊस चालु होता. मनात शंका आली ३४४५ फुट हया महाकाय अभयारण्यातुन पावसात कसं जाता येईल.पण डोंगरयात्री समुहातील जुनेजानते फार खुष होते. कारण त्याना माहीत होतं भिमाशंकर पदभ्रमण करीत गाठायचा असेल तर असेल तर पावसाशिवाय त्रासदायकच.चढताना मलाही तोच अणुभव आला.
काही वेळ तिथेच रेल्वेस्थानकावर रेंगाळत राहीलो नंतर स्थानकाबाहेर निघतो तोच ४०७ टेम्पो आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. मग काय! बॅगा टाकल्या वर अण् बसलो सारेजण रात्रभर जागल्यामुळे डोळे थकले होते.खांडस गावात कधी पोहचलो ते ही कळलं नाही.एक ते दिड तास लागला असेल कर्जत ते खांडस ४० किलोमिटर अंतर आहे. नंतर आम्ही भिमाशंकरच्या पायथ्याशी खांडस गावात पोहचलो.तेव्हा पाऊस थांबला होता.
आम्ही सकाळ होईपर्यंत विसाव्यासाठी मारुतीच्या मंदिरात थाबलो. हे मारुतीरावांच एक बरं आहे तुम्हाला क्वचीत असं गाव सापडेल जीथे ह्यांच मंदिर नसेल.सर्वांनी आपापली सोय करून माना टाकल्या .झोप येण तितकं सोपं नव्हत कारण झोप लागते ना लागते तोच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला पण आवाजात भिन्नता होती .काही वेळाने कळल कि हे आपल्यातलेच महाभाग आहेत ते घोरत होते सर्वांची टोन अलग अलग .आता ते नैसर्गिक आहे त्याला काय करणार .पण झोपमोड झाली हे मात्र खर. सकाळच्या प्रहरी पाऊस मात्र पुन्हा नाचु लागला होता. काही वेळाने मात्र त्यानेही आटपतं घेतलं. आणि बाहेर पडलो तोच समोर धुक्यात आपला चेहरा लपवून ठेवलेला महाकाय पर्वत दृस्तीस पडला. हिरवा गालीछा अंथरलेला,पांढरया शुभ्र झरयानी मडलेला,ढगांच पांघरुन घेतलेला. भिमाशंकर पर्वत.
शरीर शुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन निघण्याच्या तयारीत होतो. समोरच
निसर्गरम्य दृश्य ,डोंगरावरून वाहणारे ते झरे .तितक्यात एकाने सेल्फी स्टिक काढली हल्ली ती एक फॅशनच झालय एकाणे तर त्याबाबतीत कळसच केला होता मृतदेहाला स्मशानात नेत असताना एका हातात मृतदेह एका हाताने सेल्फी काढून पाठवलेली .काय म्हणव आता ...असो तर हे भाई सकाळ सकाळ त्या सेल्फी स्टिक ने सेल्फी काडण्याच्या तयारीत आणि मोबाईल निसटला ना त्यातून ! मग काय फुटला डिस्प्ले .झालं दिवसाची सुरवात हि अशी ..नंतर ७ च्या ठोक्याला आम्हची रिंगण बनवून ओळख परेड झाली.
वृंदावन करावडे (कुर्ला) दादानी मार्गदर्शन केलं .त्यांच्याबद्दल सांगाव तर हि भीमाशंकर पहाडावर चाडण्याची त्यांची १५० वी वेळ . मला वाटतं यातच सार काही आलं . आणि आम्ही त्यांच्याबरोबर पदभ्रमण करत वर जाणे म्हणजे आमचं भाग्यच . रूट लीडर साठी निलेश ठाकूर (बंड्या)आणि शेवटचे स्वयंसेवक (LV) प्रविण हांडे आणि मधल्या स्वयंसेवकासाठी अनिल आगाव ,अनिकेत कोळंबे, परेश राऊत ( स्वामी),आणि महिलांच्या लीडर होत्या सुजा ताई त्याचं म्हणाल तर सर्वात जुन्या (१९ वर्षे) ट्रेकर. त्यांचही कौतुक कराव तितकं कमीच आहे. सर्वाना सूचित करण्यात आलं कि येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये,चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.सर्वात महत्वाच म्हणजे कुणीही चुकीचं वर्तन करताना आढळल तर त्याला लागलीच बसने खाली पाठवण्यात येईल..........
लोकलमधे आम्हाला सोडायला आलेली ४०शीतील एक व्यक्ती ( प्रशांत म्हात्रे)आमचं तोंड गोड करण्यासाठी चक्क काजुकतरी घेऊन आलेले. आम्हा सर्वाना प्रवासासाठी शुभेच्छा देऊन ते दादरला उतरले. चर्चासत्रात तिन कसे वाजले कळले नाही.आणि पहाटे ३ वाजता कर्जतला लोकल येऊन पोहचली.सारे जण ऊतरलो पाहता पाहता ४१जणाचां समुह तयार झाला.विषेश म्हणजे आमच्यात ७ वर्षाची चिमुकली आर्या होती. मनात विचार आला ही ईवलासी चिमुकली कशी बरं चढनार? हिच्या आईबाबानी का बरं आणलं असावं हिला? मुसळधार पाऊस चालु होता. मनात शंका आली ३४४५ फुट हया महाकाय अभयारण्यातुन पावसात कसं जाता येईल.पण डोंगरयात्री समुहातील जुनेजानते फार खुष होते. कारण त्याना माहीत होतं भिमाशंकर पदभ्रमण करीत गाठायचा असेल तर असेल तर पावसाशिवाय त्रासदायकच.चढताना मलाही तोच अणुभव आला.
काही वेळ तिथेच रेल्वेस्थानकावर रेंगाळत राहीलो नंतर स्थानकाबाहेर निघतो तोच ४०७ टेम्पो आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. मग काय! बॅगा टाकल्या वर अण् बसलो सारेजण रात्रभर जागल्यामुळे डोळे थकले होते.खांडस गावात कधी पोहचलो ते ही कळलं नाही.एक ते दिड तास लागला असेल कर्जत ते खांडस ४० किलोमिटर अंतर आहे. नंतर आम्ही भिमाशंकरच्या पायथ्याशी खांडस गावात पोहचलो.तेव्हा पाऊस थांबला होता.
आम्ही सकाळ होईपर्यंत विसाव्यासाठी मारुतीच्या मंदिरात थाबलो. हे मारुतीरावांच एक बरं आहे तुम्हाला क्वचीत असं गाव सापडेल जीथे ह्यांच मंदिर नसेल.सर्वांनी आपापली सोय करून माना टाकल्या .झोप येण तितकं सोपं नव्हत कारण झोप लागते ना लागते तोच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला पण आवाजात भिन्नता होती .काही वेळाने कळल कि हे आपल्यातलेच महाभाग आहेत ते घोरत होते सर्वांची टोन अलग अलग .आता ते नैसर्गिक आहे त्याला काय करणार .पण झोपमोड झाली हे मात्र खर. सकाळच्या प्रहरी पाऊस मात्र पुन्हा नाचु लागला होता. काही वेळाने मात्र त्यानेही आटपतं घेतलं. आणि बाहेर पडलो तोच समोर धुक्यात आपला चेहरा लपवून ठेवलेला महाकाय पर्वत दृस्तीस पडला. हिरवा गालीछा अंथरलेला,पांढरया शुभ्र झरयानी मडलेला,ढगांच पांघरुन घेतलेला. भिमाशंकर पर्वत.
शरीर शुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन निघण्याच्या तयारीत होतो. समोरचनिसर्गरम्य दृश्य ,डोंगरावरून वाहणारे ते झरे .तितक्यात एकाने सेल्फी स्टिक काढली हल्ली ती एक फॅशनच झालय एकाणे तर त्याबाबतीत कळसच केला होता मृतदेहाला स्मशानात नेत असताना एका हातात मृतदेह एका हाताने सेल्फी काढून पाठवलेली .काय म्हणव आता ...असो तर हे भाई सकाळ सकाळ त्या सेल्फी स्टिक ने सेल्फी काडण्याच्या तयारीत आणि मोबाईल निसटला ना त्यातून ! मग काय फुटला डिस्प्ले .झालं दिवसाची सुरवात हि अशी ..नंतर ७ च्या ठोक्याला आम्हची रिंगण बनवून ओळख परेड झाली.
वृंदावन करावडे (कुर्ला) दादानी मार्गदर्शन केलं .त्यांच्याबद्दल सांगाव तर हि भीमाशंकर पहाडावर चाडण्याची त्यांची १५० वी वेळ . मला वाटतं यातच सार काही आलं . आणि आम्ही त्यांच्याबरोबर पदभ्रमण करत वर जाणे म्हणजे आमचं भाग्यच . रूट लीडर साठी निलेश ठाकूर (बंड्या)आणि शेवटचे स्वयंसेवक (LV) प्रविण हांडे आणि मधल्या स्वयंसेवकासाठी अनिल आगाव ,अनिकेत कोळंबे, परेश राऊत ( स्वामी),आणि महिलांच्या लीडर होत्या सुजा ताई त्याचं म्हणाल तर सर्वात जुन्या (१९ वर्षे) ट्रेकर. त्यांचही कौतुक कराव तितकं कमीच आहे. सर्वाना सूचित करण्यात आलं कि येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये,चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.सर्वात महत्वाच म्हणजे कुणीही चुकीचं वर्तन करताना आढळल तर त्याला लागलीच बसने खाली पाठवण्यात येईल..........
वर
चडन्यास सुरवात केली आम्ही पालाघरकर मात्र वर चढतानाही आणि उतरतानाही रूट
लीडर सोबत पुढेच होतो खांडस गावातून पुलापर्यंत पोहोचण्यास १५ -२० मिनिटे
लागली. पुलाजवळ पोहोचाल्य्वर उजवीकडे जो रस्ता जातो तो गणेश घाट नि आम्ही
सरळ शिडी घाटाच्या रस्त्याने निघालो .शिडी घाटाच्या सुरुवातीस एक मोठी
विहीर लागते तिथून उजविकडे पाहिले की सुंदर लोभनिय असा पदरगड़ दृस्टिस पडतो
विहीर
ओलांडली नि पावसाची रिपरिप थोडी वाढली . काही जण पावसाळी चिलखते घालून
होते. मीही त्यांच्यातील एक.जुने ट्रैकर मात्र पावसाचा आनंद लुटत होते.
थोडीशी चढण पार केल्यावर एक ओढा लागतो. जुलैला एवढा पाऊस नसून
सुद्धाओढ्याला चांगलाच वेग होता . भीमाशंकर ट्रेकची हीच खासियत असावी .तिथे
चहा व नास्त्याची सोय आहे.तिथेच अंघोळ व नसता तिथेच करून पुढे निघणार होतो
. आमच्या/आपल्या समुहतील (आमच्या आणि आपल्या ह्या दोन शब्दांवरहि फार
चर्चा झाली होती)एक वृद्ध म्हणता नाही येणार पण आम्हा सर्वांपेक्षा निच्छित
मोठे(50वर्ष) होते ते त्या ओढयातुन दगडीतून वरखाली होत एखाद्या झाडाच्या
ठोकळ्या प्रमाणे वाहत आले. आणि तोच प्रयोग एका 25शीतील तरुणाने केला त्याला
जमल नाही.मलाही जमल नसतं त्यांचा उत्साह पहन्यासारखा होता मी तर पाण्यात
ही उतरलो नव्हतो मनात थोडी चलबिचल होतीच भिजलो थंडी वाजली तर चाडणार कस.
पूढे गेल्यानंतर मात्र भिजणं रूचकर वाटू लागलं.ब्रेड बटर जाम आणि चहा
मस्तपैकी हाणला आणि निघालो पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच
आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे.
.शिडीच्या आधी रस्ता थोडा जबराटच( सिधी चडण ) आहे म्हणा.पावसाने दडी मारल्यामुळे ईथे पोहचता पोहचता दमछाक निघाली . अखेर पोहचलो शिडी घाटाच्या शिडीपाशी
.तसा दीड फुट रुंदीचा जिनाच म्हणावा लागेल पण एका वेळी एकाच जन चडू शकत होता थोडी हरकत हि करत होती शिडी .पहिली शिडी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारा जागा येतो . गुहा म्हणता येणार नाही परंतु छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी .येथून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते . एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो अशावेळी जरूर पाहावे पण खाली काही दिसत नव्हते दिसले ते सगळे धुरकट ! असो तर विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे .हि शिडी त्याहीपेक्षा सांभाळूनच चढावे लागते .ती काही फिक्स नाहीये. हि शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत अशी चढाई येते जिथे दोरीने चढावे लागते वृंदावन काका पुढे जाऊन रस्सी खाली टाकतात. रस्सी पकडून चढण्यात काय ती औरच मजा हा आता रस्सीचा हात सुटला म्हणजे संपला खेळ. तो भाग वेगळा असो. पुढे परत एक धबधबा ! तिथे मात्र भरभरून भिजलो …. येथे एक उदास झाड दिसेल नि या झाडाच्या मागे धुक्यात पदरगड लपला असावा.इथल्या बहुतांशी झाडांना शेवाळ बाजलेल. ते धुक आणि पावसामुळे .आता पुढे एका मोठे ठिगळ ओलांडून जावं लागतं ते करून हुश्श कारेस्तोपर्यंत दुसरा एक अॅनाकोंडासारखा आ वासून उभा असतो . याचे वैशिष्ट्य असे कि हा नागमोडी आहे …. चेष्टा वाटते ना जाऊन या नि मग मला सांगा . पहिला टप्पा पार केल्यावर आपणास दोन दगडाच्या मधुन वाकुन उजव्या बाजुला वळायचं असतं.पहिला ठिगळ तुलनेने सोपा आहे . परंतु दुसर्या ठिगळ च्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत . व या दगडावर प्रत्येकी एक असा माणूसच .
उभा राहू शकतो . तसेच याच्या उजव्या बाजूस धबधबा आहे.ही दोन ठिगळं आपण उत्तम रित्या पार केलीत कि शिढी घाटाचा हत्ती गेला म्हणून समजा . कारण पुढे साधी चढण आहे नि थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे मिळते. ईथे एक चहाची टपरी आहे .मंदिराकडे जातांना शिडी घाटने आल्यास आपणास सरळ टपरी लागेल .पुढे रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना खरोखर अभयारण्यात आल्याचा अनुभव येतो . वाटेत पडलेली झाडे लागतात ,चिखल रस्त्याच्या दोन्ही बाजुला महाकाय असं दाट जंगल.या ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात . कारण म्हणजे पाऊस नि धुके .
भिमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे कळते. शिगरेटचा धुरही त्यात दिसनार नाही असं धुक्याचं साम्राज्य असतं.अखेर १च्या सुमारास आम्ही तळ्यापर्यंत पोहोचलो. तळ्याचं जरी नाव हणुमान तळं असलं तरी आजुबाजुचा परीसर विचीत्र लोकांनी घान करुन टाकलेला कुठे पाय टाकावा तेही कळत नव्हतं .शेवटी तिथे फिरण्याचा मोह टाळला आणि आम्ही समुहातील बाकी सर्व येइपर्यंत वाट पाहीली. सारे जमा झाले आणि ईवलीशी आर्याही उत्साहत वर चडली होती विषेश म्हणजे ति स्वःता पायी चालुन वर आली होती कुणालाही तिने स्वःताला ऊचलुन दिल नाही सारयानीच तिचं कोडकौतुक केलं.ईथुन धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटत होते. तळ्यापासून १५ मिनिटात आपण भीमाशंकर मंदिराच्या गेट पाशी आणि १० मि.पायथ्याशी पोहचतो कारण मंदिर हे खाली आहे .पायरया उतरून खाली जावे लागते.उजव्या हाताला मंदिर , डाव्या हाताला अखिल मुंबई कामगार डबेवाले धर्मशाळा (१९३८)आमची राहण्याची सोय होती.तिथे आम्ही फ्रेश झालो पेटपुजा केली सर्वानी आपापली जेवनाची सोय घरुनच केली होती.नंतर निघालो नागफनी पाॅईट कडे.ह्या पाॅइंटच म्हणाल तर त्या डोंगराचा आकार नागाच्या फन्यासारखा आहे.

नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर,
तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर
लागते. येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटते.
त्या माळराणातुन वर येणारा हवेचा दबाव प्रचंड असतो काही वेळा तो ईतका
प्रचंड असतो की रुपयाच नाणं देखील खाली जात नाही.महाराष्ट्रात कळसुबाई
शिखरानंतर ह्याचा नंबर लागतो.तिथे जाउन खाली पाहील की कळतं आपण खाली
कोणत्या लेवलला रेंगाळत असतो.मी तर म्हणेन त्या कँडी क्रशच्या लेवल पार
करण्यापेक्षा सृष्टीने दिलेल्या जीवंत नैसर्गीक लेवल पार करण्यात आपलं
आयुष्य खर्ची घातलं तर तुम्हाला नक्कीच परमसुखाचा आनंद होईल.रोजच्या
धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच
वाटावा, यात काहीच आश्चर्य नाही. पावसाळ्यात धुक्याच्या तरल पडद्याआडून
हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून
टाकते.पण ईथे मात्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. नाहीतर सेल्फी स्टीक
वर आणि आपण खाली.तिथुन परत येताना धुकं आणखीन दाट आणि मुसळधार पाऊसही सुरु
झाला. त्याचा स्वछंद आस्वाद घेत आम्ही धर्मशाळेत परतलो.ताजेतवाने होउन छान
अंताक्षरीचा कार्यक्रम झाला,९ च्या सुमारास दर्शनासाठी गेलो.
मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. दर्शन इथेही तसच गाभारयात पोहचतो न पोहचतो तोच बाहेर ढकळलं जातं.ईश्वराचाही धंदा झाला आहे.विना टॅक्सची कमाई तीही बेहिशोबी.असो पण देव देवळात नाही तर अंतरी शोधावा...
विहीर
ओलांडली नि पावसाची रिपरिप थोडी वाढली . काही जण पावसाळी चिलखते घालून
होते. मीही त्यांच्यातील एक.जुने ट्रैकर मात्र पावसाचा आनंद लुटत होते.
थोडीशी चढण पार केल्यावर एक ओढा लागतो. जुलैला एवढा पाऊस नसून
सुद्धाओढ्याला चांगलाच वेग होता . भीमाशंकर ट्रेकची हीच खासियत असावी .तिथे
चहा व नास्त्याची सोय आहे.तिथेच अंघोळ व नसता तिथेच करून पुढे निघणार होतो
. आमच्या/आपल्या समुहतील (आमच्या आणि आपल्या ह्या दोन शब्दांवरहि फार
चर्चा झाली होती)एक वृद्ध म्हणता नाही येणार पण आम्हा सर्वांपेक्षा निच्छित
मोठे(50वर्ष) होते ते त्या ओढयातुन दगडीतून वरखाली होत एखाद्या झाडाच्या
ठोकळ्या प्रमाणे वाहत आले. आणि तोच प्रयोग एका 25शीतील तरुणाने केला त्याला
जमल नाही.मलाही जमल नसतं त्यांचा उत्साह पहन्यासारखा होता मी तर पाण्यात
ही उतरलो नव्हतो मनात थोडी चलबिचल होतीच भिजलो थंडी वाजली तर चाडणार कस.
पूढे गेल्यानंतर मात्र भिजणं रूचकर वाटू लागलं.ब्रेड बटर जाम आणि चहा
मस्तपैकी हाणला आणि निघालो पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच
आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे..शिडीच्या आधी रस्ता थोडा जबराटच( सिधी चडण ) आहे म्हणा.पावसाने दडी मारल्यामुळे ईथे पोहचता पोहचता दमछाक निघाली . अखेर पोहचलो शिडी घाटाच्या शिडीपाशी
.तसा दीड फुट रुंदीचा जिनाच म्हणावा लागेल पण एका वेळी एकाच जन चडू शकत होता थोडी हरकत हि करत होती शिडी .पहिली शिडी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारा जागा येतो . गुहा म्हणता येणार नाही परंतु छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी .येथून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते . एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो अशावेळी जरूर पाहावे पण खाली काही दिसत नव्हते दिसले ते सगळे धुरकट ! असो तर विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे .हि शिडी त्याहीपेक्षा सांभाळूनच चढावे लागते .ती काही फिक्स नाहीये. हि शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत अशी चढाई येते जिथे दोरीने चढावे लागते वृंदावन काका पुढे जाऊन रस्सी खाली टाकतात. रस्सी पकडून चढण्यात काय ती औरच मजा हा आता रस्सीचा हात सुटला म्हणजे संपला खेळ. तो भाग वेगळा असो. पुढे परत एक धबधबा ! तिथे मात्र भरभरून भिजलो …. येथे एक उदास झाड दिसेल नि या झाडाच्या मागे धुक्यात पदरगड लपला असावा.इथल्या बहुतांशी झाडांना शेवाळ बाजलेल. ते धुक आणि पावसामुळे .आता पुढे एका मोठे ठिगळ ओलांडून जावं लागतं ते करून हुश्श कारेस्तोपर्यंत दुसरा एक अॅनाकोंडासारखा आ वासून उभा असतो . याचे वैशिष्ट्य असे कि हा नागमोडी आहे …. चेष्टा वाटते ना जाऊन या नि मग मला सांगा . पहिला टप्पा पार केल्यावर आपणास दोन दगडाच्या मधुन वाकुन उजव्या बाजुला वळायचं असतं.पहिला ठिगळ तुलनेने सोपा आहे . परंतु दुसर्या ठिगळ च्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत . व या दगडावर प्रत्येकी एक असा माणूसच .
उभा राहू शकतो . तसेच याच्या उजव्या बाजूस धबधबा आहे.ही दोन ठिगळं आपण उत्तम रित्या पार केलीत कि शिढी घाटाचा हत्ती गेला म्हणून समजा . कारण पुढे साधी चढण आहे नि थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे मिळते. ईथे एक चहाची टपरी आहे .मंदिराकडे जातांना शिडी घाटने आल्यास आपणास सरळ टपरी लागेल .पुढे रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना खरोखर अभयारण्यात आल्याचा अनुभव येतो . वाटेत पडलेली झाडे लागतात ,चिखल रस्त्याच्या दोन्ही बाजुला महाकाय असं दाट जंगल.या ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात . कारण म्हणजे पाऊस नि धुके .
भिमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे कळते. शिगरेटचा धुरही त्यात दिसनार नाही असं धुक्याचं साम्राज्य असतं.अखेर १च्या सुमारास आम्ही तळ्यापर्यंत पोहोचलो. तळ्याचं जरी नाव हणुमान तळं असलं तरी आजुबाजुचा परीसर विचीत्र लोकांनी घान करुन टाकलेला कुठे पाय टाकावा तेही कळत नव्हतं .शेवटी तिथे फिरण्याचा मोह टाळला आणि आम्ही समुहातील बाकी सर्व येइपर्यंत वाट पाहीली. सारे जमा झाले आणि ईवलीशी आर्याही उत्साहत वर चडली होती विषेश म्हणजे ति स्वःता पायी चालुन वर आली होती कुणालाही तिने स्वःताला ऊचलुन दिल नाही सारयानीच तिचं कोडकौतुक केलं.ईथुन धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटत होते. तळ्यापासून १५ मिनिटात आपण भीमाशंकर मंदिराच्या गेट पाशी आणि १० मि.पायथ्याशी पोहचतो कारण मंदिर हे खाली आहे .पायरया उतरून खाली जावे लागते.उजव्या हाताला मंदिर , डाव्या हाताला अखिल मुंबई कामगार डबेवाले धर्मशाळा (१९३८)आमची राहण्याची सोय होती.तिथे आम्ही फ्रेश झालो पेटपुजा केली सर्वानी आपापली जेवनाची सोय घरुनच केली होती.नंतर निघालो नागफनी पाॅईट कडे.ह्या पाॅइंटच म्हणाल तर त्या डोंगराचा आकार नागाच्या फन्यासारखा आहे.

नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर,
तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर
लागते. येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटते.
त्या माळराणातुन वर येणारा हवेचा दबाव प्रचंड असतो काही वेळा तो ईतका
प्रचंड असतो की रुपयाच नाणं देखील खाली जात नाही.महाराष्ट्रात कळसुबाई
शिखरानंतर ह्याचा नंबर लागतो.तिथे जाउन खाली पाहील की कळतं आपण खाली
कोणत्या लेवलला रेंगाळत असतो.मी तर म्हणेन त्या कँडी क्रशच्या लेवल पार
करण्यापेक्षा सृष्टीने दिलेल्या जीवंत नैसर्गीक लेवल पार करण्यात आपलं
आयुष्य खर्ची घातलं तर तुम्हाला नक्कीच परमसुखाचा आनंद होईल.रोजच्या
धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच
वाटावा, यात काहीच आश्चर्य नाही. पावसाळ्यात धुक्याच्या तरल पडद्याआडून
हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून
टाकते.पण ईथे मात्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. नाहीतर सेल्फी स्टीक
वर आणि आपण खाली.तिथुन परत येताना धुकं आणखीन दाट आणि मुसळधार पाऊसही सुरु
झाला. त्याचा स्वछंद आस्वाद घेत आम्ही धर्मशाळेत परतलो.ताजेतवाने होउन छान
अंताक्षरीचा कार्यक्रम झाला,९ च्या सुमारास दर्शनासाठी गेलो.मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. दर्शन इथेही तसच गाभारयात पोहचतो न पोहचतो तोच बाहेर ढकळलं जातं.ईश्वराचाही धंदा झाला आहे.विना टॅक्सची कमाई तीही बेहिशोबी.असो पण देव देवळात नाही तर अंतरी शोधावा...
दर्शन झालं आणि मग धर्मशाळेत
जाऊन मस्त पोटपुजा केली आणि पहुडलो.ईथेही झोपेचा बट्याबोळच झाला.आम्ही
खोलीत दहाजण होतो त्यातील चारजण घोरणारे वाघ.... रात्र काही फळाला आली
नाही.
सकाळी धुकं अधीकच दाट झालेलं फ्रेश होउन
चहा,शिरा घेउन निघालो परतीच्या प्रवासाला बैल घाटा मार्गे नांदगावकडे
निघालो. हा तसा ऊतरायला सोपा घाट काही अंतर धबधब्याच्या मार्गातून जावं
लागतं तितकाच काय तो अवघड.
पावसाची रीपरीप चालुच होती म्हणुन पर्स बॅगेतच ठेवला आणि रस्त्याला खर्चासाठी म्हणुन शंभरची नोट बाहेर ठेवली. कुठं ठेऊ मनात विचार आला नी ती मी मोबाईलच्या बॅक कव्हरच्या मधे ठेवली बॅकव्हर पारदर्शक असल्यामुळे फोटो क्लिक करताना ती दिसत होती.खाली ऊतरेपर्यंत क्लिक करण्याआधी शंभरकडे बघा,फोटो काडायचा असेल तर शंभरची नोट कुठे आहे वैगरे,वैगरे.आता ती आठवण म्हणुन सांभाळुन ठेवावी लागनार एवडं मात्र निश्चित. वर प्रवेशद्वारापाशी सारेजण एकत्र जमलो.रूट लीडर आणि LV च्या नावाची घोषणा करण्यात आली.शंभरची नोट फोटो काढण्यासाठी सज्ज होतीच .प्रवेशद्वारापाशी फोटो सेशन करून पुढे निघालो.खाली उतरताना मात्र रमत जमत गाणी बोलत उतरत होतो
तोच मधेच शुभांगी ताईचा ( आर्या ची आई ) पाय घसरला आणि त्या पडल्या. त्यांचा पाय मुरगळला त्यांना उठताच येईना.ताईचा जरी पाय मुरगळला होता पण वेदना मात्र त्या चिमुरडीला झाल्या होत्या. पुडे जात असलेली आर्या थांबली आणि रडायला लागली ती गपच होईना तिची आई तिला सांगत होती कि मला लागलेलं नाहीये तरीही ती गप होईना.तिच्या आईच्या प्रती असलेलं प्रेम ती चिमुरडी हिरमसून व्यक्त करत होती.सुदेश कडे मुव्चा स्प्रे होता तो मारल्यानंतर त्याना काहीसा आराम मिळाला .आणि प्रवास पूर्ववत झाला. मग मात्र आम्ही पुढे रूट लीडर सोबत गेलो.मध्यंतरी एक चहाची टपरी लागते तिथे चहा नस्त आणि १०० ची नोट .तुम्ही समजला असलाच. पुढे परतीचा प्रवास आणि पायथ्याची पोहचलो. मागे वळून पाहिलं तर विश्वास बसाला नाही एवडा महाकाय असा पर्वत मी चढून सुखारोप खाली उतरलोय. हुश्श करून सुस्कारा सोडला आणि काही वेळ न्याहाळत राहिलो.पुडे काय नांदगाव ....
गावात एक बंधारा ओसंडून वाहत होता त्या वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्त आंघोळी केल्या आणि निघालो मामाच्या घरी. ते डोंगरयात्री ग्रुपचे चौकट मामा .तिथेच जेवणाची व्यवस्था होती .फ्रेश होऊन जेवण केलं .अप्रतिम जेवण ,खासकरून ठेचा ..
मग काय पुन्हा ४०७ आणि निघालो पण यावेळी अंताक्षरी जोडीला होती .त्यातील खरी जुगलबंदी म्हणावी तर जाहिरातींवरील गाणी .कुणालाही हसू आवरत नव्हत . ते निरमा ,फेना......अररररर
शेवटी पोहचलो कर्जत मग काय ६.४२ ची छत्रपती शिवाजी टर्मिनल लोकल .गर्दी मजबूत होती पण चढलो आणि जागा हि पकडली लोकलमध्ये सारेजण एकत्र आलो आणि जे नवीन होते त्यांना वृंदावन दादांनी अभिप्राय देण्यास सांगितले. साऱ्यांचा अभिप्राय म्हणजे अविस्मरणीय अनुभव. सारेजण उत्साहात होतो, खूप मजा आली, खरं सांगायचं तर डोंगरयात्री समूहाच नियोजन सुरेख ,सुंदर, शिस्तबद्ध असं होतं त्यामुळेच खरतर हा प्रवास नटखट, रुचकर,आणि मजेशीर झाला. डोंगरयात्री समूहातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव मनाला भाऊन गेला. त्या सर्वांचे आभार मानावे तितकेच थोडे आहेत.इतक्या लहान वयात पदभ्रमण करीत भीमाशंकर चढून आल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला..
मग काय जो तो आपापल्या मार्गाने घरी . पण ह्या दोन दिवसाची भ्रमंती आयुष्यभर लक्षात राहील .कस असत काही क्षण आपण फक्त अनुभवू शकतो ते शब्दात व्यक्त करता येत नाही .पण सृष्टीने आपल्या पुढ्यात भरपूर वाढून ठेवलंय ते फक्त पाहण्याची गरज आहे .
@ नित
नितेश पाटील
९६३७१३८०३१
GOOGLE :- niteshpatil715
पावसाची रीपरीप चालुच होती म्हणुन पर्स बॅगेतच ठेवला आणि रस्त्याला खर्चासाठी म्हणुन शंभरची नोट बाहेर ठेवली. कुठं ठेऊ मनात विचार आला नी ती मी मोबाईलच्या बॅक कव्हरच्या मधे ठेवली बॅकव्हर पारदर्शक असल्यामुळे फोटो क्लिक करताना ती दिसत होती.खाली ऊतरेपर्यंत क्लिक करण्याआधी शंभरकडे बघा,फोटो काडायचा असेल तर शंभरची नोट कुठे आहे वैगरे,वैगरे.आता ती आठवण म्हणुन सांभाळुन ठेवावी लागनार एवडं मात्र निश्चित. वर प्रवेशद्वारापाशी सारेजण एकत्र जमलो.रूट लीडर आणि LV च्या नावाची घोषणा करण्यात आली.शंभरची नोट फोटो काढण्यासाठी सज्ज होतीच .प्रवेशद्वारापाशी फोटो सेशन करून पुढे निघालो.खाली उतरताना मात्र रमत जमत गाणी बोलत उतरत होतो
तोच मधेच शुभांगी ताईचा ( आर्या ची आई ) पाय घसरला आणि त्या पडल्या. त्यांचा पाय मुरगळला त्यांना उठताच येईना.ताईचा जरी पाय मुरगळला होता पण वेदना मात्र त्या चिमुरडीला झाल्या होत्या. पुडे जात असलेली आर्या थांबली आणि रडायला लागली ती गपच होईना तिची आई तिला सांगत होती कि मला लागलेलं नाहीये तरीही ती गप होईना.तिच्या आईच्या प्रती असलेलं प्रेम ती चिमुरडी हिरमसून व्यक्त करत होती.सुदेश कडे मुव्चा स्प्रे होता तो मारल्यानंतर त्याना काहीसा आराम मिळाला .आणि प्रवास पूर्ववत झाला. मग मात्र आम्ही पुढे रूट लीडर सोबत गेलो.मध्यंतरी एक चहाची टपरी लागते तिथे चहा नस्त आणि १०० ची नोट .तुम्ही समजला असलाच. पुढे परतीचा प्रवास आणि पायथ्याची पोहचलो. मागे वळून पाहिलं तर विश्वास बसाला नाही एवडा महाकाय असा पर्वत मी चढून सुखारोप खाली उतरलोय. हुश्श करून सुस्कारा सोडला आणि काही वेळ न्याहाळत राहिलो.पुडे काय नांदगाव ....
गावात एक बंधारा ओसंडून वाहत होता त्या वाहणाऱ्या पाण्यात मनसोक्त आंघोळी केल्या आणि निघालो मामाच्या घरी. ते डोंगरयात्री ग्रुपचे चौकट मामा .तिथेच जेवणाची व्यवस्था होती .फ्रेश होऊन जेवण केलं .अप्रतिम जेवण ,खासकरून ठेचा ..
मग काय पुन्हा ४०७ आणि निघालो पण यावेळी अंताक्षरी जोडीला होती .त्यातील खरी जुगलबंदी म्हणावी तर जाहिरातींवरील गाणी .कुणालाही हसू आवरत नव्हत . ते निरमा ,फेना......अररररर
शेवटी पोहचलो कर्जत मग काय ६.४२ ची छत्रपती शिवाजी टर्मिनल लोकल .गर्दी मजबूत होती पण चढलो आणि जागा हि पकडली लोकलमध्ये सारेजण एकत्र आलो आणि जे नवीन होते त्यांना वृंदावन दादांनी अभिप्राय देण्यास सांगितले. साऱ्यांचा अभिप्राय म्हणजे अविस्मरणीय अनुभव. सारेजण उत्साहात होतो, खूप मजा आली, खरं सांगायचं तर डोंगरयात्री समूहाच नियोजन सुरेख ,सुंदर, शिस्तबद्ध असं होतं त्यामुळेच खरतर हा प्रवास नटखट, रुचकर,आणि मजेशीर झाला. डोंगरयात्री समूहातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव मनाला भाऊन गेला. त्या सर्वांचे आभार मानावे तितकेच थोडे आहेत.इतक्या लहान वयात पदभ्रमण करीत भीमाशंकर चढून आल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला..
मग काय जो तो आपापल्या मार्गाने घरी . पण ह्या दोन दिवसाची भ्रमंती आयुष्यभर लक्षात राहील .कस असत काही क्षण आपण फक्त अनुभवू शकतो ते शब्दात व्यक्त करता येत नाही .पण सृष्टीने आपल्या पुढ्यात भरपूर वाढून ठेवलंय ते फक्त पाहण्याची गरज आहे .
@ नित
नितेश पाटील
९६३७१३८०३१
GOOGLE :- niteshpatil715









No comments:
Post a Comment