सस्नेह जय शिवराय नितेश पाटील ९६३७१३८०३१
nitesh715@gmail.com
⛳शिवप्रेमी गडयात्री पालघर⛳
⛳राजगड गिरिभ्रमण (ट्रेक)१३मार्च२०१६⛳
सस्नेह जय शिवराय
आयुष्य चौकटीचे ...... म्हणत होतो मी माझे.....
भेदून आज निघालो...... सह्याद्रीच्या वाटे.....
लेखातील फोटो सौजन्य :- शिवप्रेमीगडयात्री सदस्य
बहुतांशी माणसाचे आयुष्य एका चौकटीत चालू होते आणि संपतेही. काहींचा पसारा छोटा तर काहींचा मोठा... इतकंच. पण त्याही ऊपर जाऊन जे मातृभूमिसाठी, समाजासाठी, जनकल्याणासाठी जगतात त्यांची आणि त्यांचीच किर्ती अजरामर राहते, इतिहास त्याचा साक्षी आहे आणि त्यांचे पराक्रम, शौर्य, निष्ठा, निसर्ग-जनसामान्यांप्रती प्रेम याच्या संपर्कात जसजसा वर्तमान काळ येत जातो तसा तो अभिमानाने फुलत जात असतो हे सांगायची गरज नाही.
काही गोष्टी करत असताना आपण मर्यादेत राहणंही गरजेचं असते. जिथे आपल्याला गिरिभ्रमण करणं जड जाते तिथला कण न् कण शौर्याने, पराक्रमाने गाजलेला आहे. ज्यांनी आपले चौकटीचे आयुष्य बाजूला सारून संपूर्ण राज्याचे सार असलेल्या दुर्ग सहाय्याने, निष्ठावंत मावळ्यांच्या साथीने धगधगत्या उन्हात, मुसळधार पावसात, मेघांच्या गरजण्यात, विजेच्या मारात, सैतानी आक्रमणास पिटाळून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, हयात भर टिकवले. तो इतिहास आजही जिवंत आहे आणि राहील. त्या सर्वांस माझा शत शत मानाचा मुजरा.
मला ज्ञात आहे हे बोलून, लिहून अथवा दाखवून साध्य होत नसते तर त्यासाठी त्या सर्वांनाच (गडकोट,शिवराय,मावळे) आधी समजून घेतलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पद्धतीच आचरण केलं पाहिजे...आज गडकोट गिरिभ्रमण करणाऱ्यांची संख्या भलतीच वाढताना दिसते आहे हि चांगली बाब आहे. पण सर्वच गिरिप्रेमींनी गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे. सगळ्या प्राचीन इतिहासाचं स्मरण, आणि त्याच बरोबर तो इतिहास जपणं, जागृत करणं हाच दुर्गभ्रमंतीचा मूळ उद्देश असला पाहिजे. शूर विरांचे सळसळते रक्त त्या मातीत मिसळले आहे आणि आजही तो गंध, तो थरार तेथे अनुभवता येतो. तो आपल्याला जाणवायला हवा तरच हि दुर्गयात्रा सुफळ पूर्ण होऊ शकते. अन्यथा निरर्थक पायपीट...!!!
प्रथम दर्शनी प्रेमात पडावा.... शिवरायांचा हरेक किल्ला .....
श्री राज्याची राजधानी प्रथम..... दुर्गाशिल्प राजगड किल्ला.....
रतन गडानंतर आता बेत होता स्वराज्याची पहिली राजधानी राजगड गिरिभ्रमण(ट्रेक).गडावरील सखल भाग उंची ३९१२ फूट, अन तिथून बालेकिल्ला सरासरी ६०० फूट उंच. मार्चच्या रणरणत्या उन्हात हा आमचा पहिलाच ट्रेक. १२ मार्च २०१६ ची संध्याकाळ. एक एक करून सारे शिवप्रेमी गडयात्री जमले. पण बस काही येईना..!! सहाची वेळ देऊनही साडे आठ वाजेपर्यंत ताटकळत राहावं लागलं. नऊ वाजता धनसारहून श्री गणेशा करून निघालो. पालघरलाही पाच जण रेंगाळतच बसले होते. त्यांना घेऊन प्रस्थान केले. मनोरला(मस्तान) पोहचून गाडीची तहान भागवली. आता ती रात्रभर न थांबता पाळणार होती. त्याचबरोबर सोबत घेतलेली बिर्यानीही तिथेच खाली उतरली. आम्ही कावलो होतो हे बहुदा तिला कळलं असावं. मग काय बसली पंगत..!! आणि केली सुरवात....मजबूत खाल्लं.. शिल्लक बिर्याणी सोबत घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला...सोबत फोटोग्राफर अंकुर राऊत आणि दोन DSLR. बाकीही होतेच म्हणा...आणि शंभरची नोट निवांत......
पुढचा प्रवास म्हणाल तर ठाणे, एक्सप्रेस हायवे मार्गे पुणे. बसने आपला रस्ता धरला. मागच्या ट्रेकचा उजाळा करत प्रवासाची सुरवात झाली. ढोलकिनी ताल धरला, टाळही वाजू लागले. आणि पाहता पाहता बसचे रूपांतर एका संगीतमय मैफिलीत झाले. वेळ कसा निघून गेला तोही कळला नाही. अडीच वाजेपर्यंत मैफिल चालू राहिली. तदनंतर शिल्लक बिर्याणी हाणली...आणि टोपाला मोकळीक करून दिली. उगाच त्याला कशाला भार नाही का..?? असो.. आता मात्र पुढचा रस्ता ओळखीचा नव्हता. पुणे-सातारा हायवे वरचा शिवापूर टोल नाका सोडून नरसापुर फाट्यावरून उजवीकडे बस मार्गस्थ झाली होती. आम्ही चार,पाच जण सोडले तर बाकी सर्वांच्या पापन्यांनी आपापसात आलिंगन घेतलं होतं. GPS चालू केला आणि पुढचा प्रवास नरसापुर, अंबवणे, मार्गासणी येथे डावीकडे वळून साखरगावी पोहचलो तेथून पुन्हा डावीकडे वळून चिरमोडीहून सरळ राजगड पायथ्याशी गुंजवणे गावात. जिथे काळा रस्ता संपतो. पोहचता पोहचता पाच वाजले. आता झोपणे अशक्यच होते. बस ठरल्या वेळेत आली असती तर दोन तास झोप मिळाली असती हे मात्र नक्की....असो...
काळ्या सफेद रस्त्यांनी...
सुरवात केली...
रात्रीस खेळ चाले...
मिणमिणते दिवे वाटांनी...
सह्याद्रीच्या कुशीत...
पायथ्याशी पोहचलो...
जागेच रान कधीचे...
मळलेल्या रान वाटांनी...
गुंजवणे गावात राहण्याची सोय आहे. महाराजांचा आसनस्थ सुरेख असा पुतळा आहे. समोरच सभामंडप आहे जिथे सत्तर ते ऐंशी माणसं आरामात विश्रांती घेऊ शकतात. आम्ही सुवेळा गार्डन (गुंजवणे) (प्रो.राहुल बांदल मो.७५०७४३२८९८,९४२२३०१५९६) येथे काही काळ विश्रांती, शरीर शुद्धी करून चहा नाश्ता आपोटून ओळखपरेड कडे वळलो. १... अमुल पाटील-वगुळसार(L), सुदेश मोरे-धनसार(FV), अंकुर राऊत-धनसार(FV), अजय भोईर-धनसार, अतुल घरत-धनसार, अच्युत मोरे-धनसार, गणेश घरत-सफाळे, सुशांत देसले-खारेकूरण, हितेश घरत-धनसार, निनाद पाटील-नांदगाव, स्नेहल राऊत-धनसार, विकास मोरे-टेंभोडे, अखिलेश मोरे-धनसार(MV), अभिनेष किणी-खारेकूरण, निखिल पाटील-पालघर, वैभव पाटील-सातपाटी, पियुष घरत- ऐरोली, हिमांशू राऊत-धनसार, मनीष मोरे- शिरगाव, अक्षय किणी-शिरगाव, प्रणित पाटील-नवली, जतीन मोरे-धनसार, सिद्धार्थ मोरे-धनसार, अमोल राऊत-धनसार, परेश राऊत-शिरगाव (LV)अन मी नितेश पाटील-धनसार(LV). अमूलने मार्गदर्शन केलं. सोबत वाट दाखविण्यासाठी वाटाड्या म्हणून गुंजवणेचे काका". मागच्या वेळेस एकोनावीस जण होतो आता तब्बल सव्वीस जण. उत्साह वाढतोय हे मात्र नक्की.
भार डोईवर... माणसं जपण्याचा
शिवसंस्काराची ज्योत... तेवत ठेवण्याचा...
समूह जर वाढत असेल तर समूहाची जिम्मेदारीही वाढत असते त्याच बरोबर समूहात सामील होणाऱ्या प्रत्येकाची. इथे माझं या शब्दाला जागा नसलेलीच बरी, जे काही आहे ते आपलं. समूहाची व्याख्या सोपी असते. आपण स्वतः एक समूह असतो. माझं नाव हे त्या समूहाला दिलेलं नाव आहे. हात,पाय,कान,नाक,डोळे, ई. हे त्या समूहाचे सदस्य आहेत. आपल्या देहाच्या प्रत्येक इंद्रियांची, अवयवांची नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. प्रत्येकाचं आपलं स्वतःच असं प्राविण्य आहे. नाकाचं कार्य कान करू शकत नाही. कानाच कार्य तोंड करू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे साऱ्याच अवयवांच कार्य कुशल आहे पण ते त्याच्या ठाई आणि त्याच्या कौशल्याने. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये.
आम्हास असावा छंद...
गडदुर्ग फिरण्याचा...
जिवंत आजही इतिहास...
तो जाणण्याचा...
प्रत्येकाजवळ आपली एक स्वतःची कला असते ती ओळखून वाढीस लावली पाहिजे तरच तुमचं आणि तुमच्याबरोबरच तुमच्या देहरुपी समूहाचं कल्याण होईल. तुम्ही तुमचं कौशल्य कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार करायला हवा. इंद्रियांशिवाय देह नाही आणि देहाशिवाय इंद्रिय नाहीत. किंमत दोहींना सारखीच. हे दोन्ही चुंबकीय क्षेत्र आहेत एक उत्तर आणि एक दक्षिण. जे एकमेकांत घट्ट रूतलेले असतात. म्हणून त्यांना किंमत असते आणि समूहालाही. काही चुका होत असतात पण त्या वेळीस मान्य करून पुन्हा होणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि शिवप्रेमीगडयात्री समूह निश्चितच फक्त देह नव्हे, माणूस नव्हे तर शिवरायांचा निष्ठावंत मावळा म्हणून जगेल याची मला खात्री आहे.
इंद्रीयावीन देह नाही..... देहावीण नाही मी .....
माझं म्हणून काय जगावं..... देहावीण जर व्यर्थ मी.....
सकाळ झाली. सात वाजता गड चढण्यास आम्ही सुरवात केली. सूर्यनारायनाच्या दिशेने प्रस्थान करत असलेली धरणी माता प्रकाशित झाली. आकाशात केशरी छटा पसरली... सोनपिवळी किरणे जसजसी गडावर पडु लागली तसा पिवळ्या गवताची चादर ओढलेला राजगड संधिप्रकाशातून बाहेर पडू लागला. त्याचं सौंदर्य खुलू लागलं. दोन तेजस्वी बिंब समोरासमोर उभे ठाकले होते. राजगडाचा तो त्रिशंकू पसारा आणि अभेद्य असा बालेकिल्ला पाहून बहुतेक सुर्यनारायनासही वाटलं असावं कि तो त्यास कवेत घेईल. म्हणूनच त्यांनी वरचा रस्ता धरला असावा. गडावर चढताना उजव्या अंगाला खाली डोंगराच्या डोंगर धुरताना दिसले. काही काळे राख झालेले. बरं त्या डोंगरावर फारशी झाडही नाहीत कि वणवा लागेल म्हणून...मला हे समजत नाही आपल्या पूर्वजांनी ज्या पाषाणावर बसून आपल्या घावांच दुखनं निरपुन काढलं, तिथं आम्ही विड्या विझवतो ..!! लाजा कशा नाही वाटत हो...!!
अंगावर येते वाट....
मागे वळणार नाही.....
घेतला वसा सह्याद्रीचा.....
सोडणार नाही.....
एव्हाना आम्हीही पद्मावती माचीच्या बुरुजाखाली पायथ्याशी येऊन पोहचलो होतो. गुंजवणे गावातून गडावर तीन रस्ते जातात. पहिला गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने(सोंडेचा दरवाजा). दुसरा गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने(सुवेळा माची). तिसरा गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने(पद्मावती माची). हा मार्ग तसा सोपा. माचीच्या पायथ्यापासून ते चोर दारवाज्यापर्यंत काहीसा अवघड, अंगावर येणारा रस्ता. तसे अधे मधे लोखंडी गज सेवेसाठी तत्पर आहेतच. ऊन्हंहि आता वाढली होती. पण फारसा त्रास जाणवत नव्हता. हवेत गारवा होता आणि हे सह्याद्रीच न दिसणारं सौंदर्य मनाला भुरळ पाडत होतं. आमचे गडयात्री एक एक करून चोरदारावाज्यातून गडावर पोहचले न् आम्हीही. दरम्यान सकाळी साडे नऊच्या सुमारास आम्ही पोहचलो. उजव्या हातावरच वसलेला स्वराज्याचं प्रथम तोरण तोरणा आणि आम्ही सध्यस्तीत असलेला श्री राज्याची प्रथम राजधानी राजगड. ती इतिहासाची पानं पुन्यांदा समोर ठाकली, ते शौर्य,पराक्रम,निष्ठा ज्यांना शब्दात गणनं अशक्यच...!!
चोर दरवाज्यापाशीच बस्तान घेऊन नास्ता उरकला. नेहमी प्रमाणेच ब्रेड, बटर, जॅम. तदनंतर गड फिरण्यास सूरवात केली. आपण जेव्हा समूहाबरोबर बाहेर पडतो त्यावेळेस शिस्तीच भान प्रत्येकालाच असलं पाहिजे. गिरिभ्रमण म्हणजे मजा मस्ती मुळीच नाही. किंव्हा दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर नाही. गिरिभ्रमण म्हणजे डोंगर चढण आहे, रान तुडवने आहे, स्वतःच अंथरून पांघरून पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडणे आहे, तिथे असतो भराट वारा, असाते कळा कळा तापणारं ऊन, त्या उन्हावर फुंकर घालणारी सह्याद्रीच्या कुशीतील मायाळू शीतल हवा, असतात मोकाट डोंगर दरे, इतिहासाच्या जिवंत खुणा, आणि बरच काही. पण हे साध्य करण्यासाठी केवळ उत्साह असून चालत नाही....ते आव्हान असतं जिद्दीला. पुरषार्थाला ..!!
मागे वळणार नाही.....
घेतला वसा सह्याद्रीचा.....
सोडणार नाही.....
एव्हाना आम्हीही पद्मावती माचीच्या बुरुजाखाली पायथ्याशी येऊन पोहचलो होतो. गुंजवणे गावातून गडावर तीन रस्ते जातात. पहिला गुंजवण्याहून गुंजवणे (गुंजण) दरवाज्याने(सोंडेचा दरवाजा). दुसरा गुंजवण्याहून सुवेळा माचीवरच्या चोरदिंडीने(सुवेळा माची). तिसरा गुंजवण्याहून पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने(पद्मावती माची). हा मार्ग तसा सोपा. माचीच्या पायथ्यापासून ते चोर दारवाज्यापर्यंत काहीसा अवघड, अंगावर येणारा रस्ता. तसे अधे मधे लोखंडी गज सेवेसाठी तत्पर आहेतच. ऊन्हंहि आता वाढली होती. पण फारसा त्रास जाणवत नव्हता. हवेत गारवा होता आणि हे सह्याद्रीच न दिसणारं सौंदर्य मनाला भुरळ पाडत होतं. आमचे गडयात्री एक एक करून चोरदारावाज्यातून गडावर पोहचले न् आम्हीही. दरम्यान सकाळी साडे नऊच्या सुमारास आम्ही पोहचलो. उजव्या हातावरच वसलेला स्वराज्याचं प्रथम तोरण तोरणा आणि आम्ही सध्यस्तीत असलेला श्री राज्याची प्रथम राजधानी राजगड. ती इतिहासाची पानं पुन्यांदा समोर ठाकली, ते शौर्य,पराक्रम,निष्ठा ज्यांना शब्दात गणनं अशक्यच...!!
वर्षे चारशे गेली न तुटले अजुनी बंध
सह्याद्री अजुनी त्या पराक्रमात धुंद....
इतिहास अजुनी तोच मानसं बदलली
साक्ष आजही देते सह्याद्री शिवरायांची....
लाख संकटे झेलून आजही खंबीर उभे
तटा बुराजांचे किल्ले वैभव राष्ट्रांचे ....
सहज पेलली संकटे पळविले सैतान
गड यात्रेत उजागर होते ते शौर्य महान ....
नाद गुंजतो आजही तेथे जय भवानी
साद घालतो शिवप्रेमी तो जय शिवाजी....
जय जय जय जय जय भवानी....
जय जय जय जय जय शिवाजी ....
..........नितेश पाटील
राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही भग्न अवस्थेत शिल्लक आहेत. चोरदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आहे. तलावाच्याभिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. या तलावातील पाणी बारमाही असते. खोली नव्वद फूट असावी असा गावकऱ्यांचा कयास आहे, तलावाचे पाणि आटवण्याचा एकदा शासनाने निष्फळ प्रयत्न केला होता असे गावकरी सांगतात. तलावाच्या डाव्या अंगाने पुढे चालत गेले कि पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. आता दोन्ही भग्नावस्थेत आहेत. ..........नितेश पाटील
नवीन सदर बांधण्याचं काम, तटबंदी दुरीस्तीचं काम गडावर चालू आहे. ते पाहून आम्हा साऱ्याच शिवप्रेमींना एक विशेष आनंद झाला. काहिका होईना ? काम चालू आहे हे महत्वाचं. सारे गडकिल्ले म्हणजे म्हणजे शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारी स्मारकेच आहेत ती जपली पाहिजेत. इतिहासातील अनेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. महाराजांनी याच किल्याच्या आधारे हिंदवी स्वराज्य उभे केले. आणि या किल्ल्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाकडून होत नाही याबद्दल गडकिलल्यांवर काम करणाऱ्या अनेक गडाप्रेमींनी सांस्कृतिक मंत्र्यांजवळ चिंता व्यक्त केली होती. गडकिल्यांचे हे महत्व आणि अस्मितेचा प्रश्न लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१५ मध्ये गड किल्ले संवर्धन समिती स्थापन केली. या संवर्धनाच्या कामात अनेक गडाप्रेमी व दुर्गप्रेमी यांचाही सहभाग अपेक्षित आहे. दुर्गप्रेमीकडून किल्यांचे हवे तसे त्यांच्या परीने संवर्धन केले जाते. पुरातत्व विभागाकडे सध्या मनुष्यबळ कमी आहे आणि गडांची संख्या खूप जास्त आहे.अश्या परिस्तिथीत संवर्धन करणाऱ्या उत्साही गड प्रेमींना या कार्यात सामावून घेण्याचा निर्णय गड किल्ले समितीने केला आहे. आणि त्याच उद्देशाने या वर्षीपासूनच महाराष्ट्र शासनातर्फे रायगड या महाराजांच्या द्वितीय राजधानीच्या किल्ल्यावर एक विशेष महोत्सव साजरा केला गेला आणि पुढेही केला जाईल. आणि या पाच दिवसाच्या कार्यक्रमात अनेक गडप्रेमी, इतिहासप्रेमी सहभागी झाले होते. आपल्या येथूनही सुदेश,परेश,निकेत,आशु सहभागी झाले होते. महत्वाचं म्हणजे किल्ल्यांचे जतन फक्त जागेवरच न होता ते लोकांच्या मनात देखील झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने किल्ल्यांचे संवर्धन होईल.
किल्ले रक्षणासी उभा..... अभेद्य बालेकिल्ला....
राजगडाचा मुकुटमनी.....अनिकेत तपस्वी योद्धा....
पुढे आम्ही बालेकिल्ल्याकडे कूच केली.यावर जाण्यासाठी एकच वाट असून ती पुर्वीय अंगाला आहे. पद्मावती माचीवरून एक सामान्य चढण पार करून आम्ही अश्या ठिकाणी पोहचलो कि जेथे डाव्या अंगास खोलच खोल अक्राळविक्राळ दरी आणि समोर उजव्या अंगास भिंतीसारखा कडा आहे. वर जाण्यासाठी या कड्यातून अत्यंत आबोडधोबड, कमी अधिक लांबी, रुंदीचे, उंचीचे पायंडे आहेत. हात धरण्यासाठी त्या कातळात खोबण्या केलेल्या आहेत. सरावलेल्या माणसां खेरीज इतरांना येथून फार जपून चढावे उतरावे लागते. आपणास सुरक्षा वाटावी म्हणून दरीच्या अंगाने लोखंडी गज मारले असले तरी भय वाटतच राहते. विशेषतः उतरताना...
हो नाय करत आम्ही सारे बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. आणि एकच नाद गुंजला... "राजश्रिया विराजित" "सकळगुणमंडळीत" "प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी" "रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री" "छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की जय... आणि अंगावर सर्रर्रर्रर्रर्र करून काटा उभा राहिला.
किल्ले रक्षणासी उभा..... अभेद्य बालेकिल्ला....
राजगडाचा मुकुटमनी.....अनिकेत तपस्वी योद्धा....
पुढे आम्ही बालेकिल्ल्याकडे कूच केली.यावर जाण्यासाठी एकच वाट असून ती पुर्वीय अंगाला आहे. पद्मावती माचीवरून एक सामान्य चढण पार करून आम्ही अश्या ठिकाणी पोहचलो कि जेथे डाव्या अंगास खोलच खोल अक्राळविक्राळ दरी आणि समोर उजव्या अंगास भिंतीसारखा कडा आहे. वर जाण्यासाठी या कड्यातून अत्यंत आबोडधोबड, कमी अधिक लांबी, रुंदीचे, उंचीचे पायंडे आहेत. हात धरण्यासाठी त्या कातळात खोबण्या केलेल्या आहेत. सरावलेल्या माणसां खेरीज इतरांना येथून फार जपून चढावे उतरावे लागते. आपणास सुरक्षा वाटावी म्हणून दरीच्या अंगाने लोखंडी गज मारले असले तरी भय वाटतच राहते. विशेषतः उतरताना...
हो नाय करत आम्ही सारे बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. आणि एकच नाद गुंजला... "राजश्रिया विराजित" "सकळगुणमंडळीत" "प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी" "रणधुरंदर" "क्षत्रिय कुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री" "छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की जय... आणि अंगावर सर्रर्रर्रर्रर्र करून काटा उभा राहिला.
चारशे वर्षांनंतरही त्या दोन अष्टकोनी बुरुजांमध्ये अभेद्य असे प्रवेशद्वार ठाण मांडून आजही दिमाखात उभे आहे... कोण जिगरीच काम...कसा बांधला असावा बालेकिल्ला...जिथे चढणंही सहज शक्य नाही... तिथे हि वास्तू कशी उभारली असणार...?? इथे एक प्रश्न आपण स्वतःशी नक्की करावा त्या शौर्यासमोर आपली औकात ती काय..??? शून्य आणि केवळ शून्यच...मिरवणं वेगळं आणि अंगी असणं वेगळं...
अदृश्य ते रूप गोजिरे.... आपल्या सह्याद्रीचे......
टाक्यांनी व्यापली आहे. आणि ते अवशेष पाहता शिवकाळात येथे मोठया हावेल्या असल्याची खात्री होते. पद्मावती माचीप्रमाणे इथेही निवासवाडा, सदर व आणखीही मात्तबरांची घरं असल्याचा अंदाज येतो. बालेकिल्यावरून गडाची ठेव अगदी विमानाप्रमाणे दिसते. सुवेळा माची आणि संजीवनी माची हे दोन पंखच जणू. आणि ते विमान सिंहगडाकडे रोखलेले दिसते. राजगडावरून सिंहगड, तोरणा, रायगड असे बरेच किल्ले दृष्टीस पडतात. गडाची तटबंदीहि भलतीच आकर्षक दिसते. मन मोहून टाकणारी...
कृपा जगदंबेची.... आई भवानीची..... संग सोबत निष्ठावंत मावळ्यांची....
हे राज्य व्हावे हि तर श्री ची इच्छा.... शिव छत्रपतींनी जोडली माणसं निष्ठेची....
सूर्यदेव डोईवर असतानाही घळीतून येणारा गार वारा सुखावत होता.आता आमची सवारी सुवेळा माचीकडे वळली. मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा 3 टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर चिलखती बुरुजाकडे घेऊन जाते.चिलखती बुरुजावर माकडांची वर्दी होती. इथून बालेकिल्ला जणू उंच उंच दगडांच्या रचलेल्या भिंतीवर सिंहासनाधिस्त झाला आहे.
काही वेळ तिथे घालवून थोडी विश्रांती घेतली. तशी काही प्रमाणात साऱ्यांची दमछाक निघाली होती. माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी
चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात 3 मीटर व्यासाचे एक नेढे आढळते जसे रतन गडावर आहे त्याच प्रकारचे.
या खडकालाच 'हत्तीप्रस्तर'असेहि म्हणतात. म्हणजे सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्यावरून जर चिलखती बुरुजाकडे पहिले तर तो हत्ती असल्याचा भास होतो. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडन पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात आहे. राजगड नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांनी वेढलेला आहे.सुवेळा माचीच्या उजव्या अंगास त्या पर्वतीय कोंदणात नदीचं पात्र उन्हामध्ये तळपताना दिसते.
बाजू एक अशीही तशीही..... माझी कैक पटीने बरीही....
संस्काराचा खेळ सारा....समाधानात सुख जरी दुखःही....
सूर्य माथ्यावरून खाली उतरण्यास सुरवात झाली, दुपारचा एक वाजला. सकाळी सात वाजेपासून आमची ऐतिहासिक वाटांवरून पायपीट चालू होती. थकवा जाणवला नाही पण पोटात कावळे मात्र कावले होते. आमच्यासाठी नाही पण निदान त्यांच्यासाठी आम्हाला भोजन करावं लागणार होते. अखेर आम्ही पुन्हा पद्मावती माचीचा रस्ता धरला. वाटेत आम्हाला बारा वर्षाचा होतकरू मुलगा भेटला. हातात एक गोन. त्यामधे ताक, पाणी, लिंबूसरबत हे सारं घेऊन वणवण करत हिंडत होता. आम्हालाही बराच आग्रह केला त्याने. कि तुम्ही निदान ताक तरी घ्यावं. मग आम्हीही त्याला सोबतच घेऊनच खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्याची चौकशी केली तेव्हा कळलं कि सातवीत शिकणारा अत्यंत हुशार ,मेहनती आणि जिद्दी मुलगा. दीपक नाव त्याचं. ज्याला राजगडाची खडा न खडा माहिती. पुढे मोठा पोलिस अधिकारी व्हाव हे त्याचे स्वप्न. सातवी मधे शिकत असूनहि रविवारी आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून पाणी, ताक, लींबु सरबत घेऊन पालिहून गडावर पायपीट करत येतो. जेणेकरून ते आपल्याकडून विकलं जाईल. रविवारची सुट्टी फळाला येईल, दोन पैसे खर्चासाठी सुटतील. तेवडीच आपल्या आईवडिलांना मदत होईल. खाण तशी माती म्हणतात ती अशी...विशेष म्हणजे आज त्यांच्या शाळेत गॅदरिंग. त्यात त्याने भाग घेतलेला. एक महाराजांचा पोवाडा, तर दुसरं खंडोबाचं गीत नृत्य. त्याचे वडील छोटेखानी शाहीर...बघा कसले संस्कार आहेत. नाहीतर आपल्याकडची मुलं...तुलना करा फक्त...बाकी आपण काहीही करू शकत नाही. मुळात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी..असो....आपल्या शिवप्रेमी गडयात्री समुहतर्फे त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.. आणि त्याच्या ह्या जिद्दीला मानाचा मुजरा
दीपक आणि वाटाड्या काकांच्या संगतीनेच आम्ही जेवणाचा कार्यक्रम उरकला. पाककलेत समृद्ध असलेल्या तब्बल सव्वीस कुकनी जो स्वाद डब्यात बंदिस्त करून दिला होता त्याला मोकळीक दिली आणि उदराचा रस्ता दाखवला. त्या आस्वादानेच सारे तृप्त झाले. आता पावणेतीन वाजले होते. वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. सर्वाना पुन्हा प्रस्तावित करण्यात आलं. गड आम्ही जरी चोर दरवाज्याने चढले असू तरी उतरतेवेळेस मात्र पाली दरवाज्याने उतरणार होतो.काकांना बस गुंजवनेहून पाली गावात आणण्यासाठी रवाना केले आणि आम्ही दीपक सोबत गडाची माहिती घेत पाली दरवाजा गाठला. तत्पूर्वी संजीवनी माची. संजीवनी माचीवर येण्यासाठी अळु दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग यादरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा 3 टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. या माचीला एकूण 19 बुरुज आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. वेळे अभावी संजीवनी माची वर जाणे जरी टाळले असले तरी दिपकचं मार्गदर्शन आणि माचीची भव्य उत्कृष्ट अशी ताटबंदीच भुरळ पडणारी आहे. पावसाळ्यात या गडाचं सौंदर्य डोळ्यात मावणार नाही हे मात्र नक्की.
पाली दरवाज्यातून बालेकिल्ला, संजीवनी माची आणि तोरणा न्याहाळताना आपले पाय जागचे हालत नाहीत.त्यांना रेटून पुढे धकालावं लागतं. पालीगावात जाण्याचा मार्ग पाली दरवाजातून जातो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्या उतरण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत.पायर्यांची उंची दमछाक करणारी आहे. उरतावेळेस पहिल्या प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवड्याआहेत. ते प्रवेशद्वार ओलांडून खाली 200 मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. गडाच्या प्रत्येक टप्प्यांवर केलेली प्रतिकाराची रचना तसेच प्रत्येक दरवाजा तसेच बुरुजाला मागाहून दिलेले दुहेरी संरक्षण हे राजगडच्या वास्तुंचे मह्त्वाचे वैशिष्ट्य! महाद्वाराच्या आत एक दुर्बोध शिलालेख दिसतो.
भरभक्कम कोंडिव्यूह रचना .... राजगड पाली द्वार.....
गज अंबारी सहित यावा.....दुहेरी संरक्षित भव्य द्वार....
अदृश्य ते रूप गोजिरे.... आपल्या सह्याद्रीचे......
जिवंत अजुनी शौर्य इथले.....माझे रोजचे मरणे.....
तसेच बालेकिल्ल्याचा दिशेने वर गेले कि उजव्या हातावर राजप्रसाद आणि पाली दरवाज्यासमोरच्या बाजूलाच मोठा वाडा होता.आता दोन्ही भग्नावस्थेत आहे काही पाण्याचे टाके हि आहेत. बालेकिल्ला मुळातच चाहुबाजूनी कडा तुटलेल्या उंच उंच अश्या खडकांवर असल्याने त्यास तशी तटबंदीची गरज नसावी.पण अधिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यशही तटबंदी करून माऱ्याचे बुरुज आहेत. याच्या माथ्यावर तसे फार मोठे मैदान नाही. तरीही वरची सर्व जाग घराठाणांनी आणि पाण्याच्या टाक्यांनी व्यापली आहे. आणि ते अवशेष पाहता शिवकाळात येथे मोठया हावेल्या असल्याची खात्री होते. पद्मावती माचीप्रमाणे इथेही निवासवाडा, सदर व आणखीही मात्तबरांची घरं असल्याचा अंदाज येतो. बालेकिल्यावरून गडाची ठेव अगदी विमानाप्रमाणे दिसते. सुवेळा माची आणि संजीवनी माची हे दोन पंखच जणू. आणि ते विमान सिंहगडाकडे रोखलेले दिसते. राजगडावरून सिंहगड, तोरणा, रायगड असे बरेच किल्ले दृष्टीस पडतात. गडाची तटबंदीहि भलतीच आकर्षक दिसते. मन मोहून टाकणारी...
कृपा जगदंबेची.... आई भवानीची..... संग सोबत निष्ठावंत मावळ्यांची....
हे राज्य व्हावे हि तर श्री ची इच्छा.... शिव छत्रपतींनी जोडली माणसं निष्ठेची....
सूर्यदेव डोईवर असतानाही घळीतून येणारा गार वारा सुखावत होता.आता आमची सवारी सुवेळा माचीकडे वळली. मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा 3 टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर चिलखती बुरुजाकडे घेऊन जाते.चिलखती बुरुजावर माकडांची वर्दी होती. इथून बालेकिल्ला जणू उंच उंच दगडांच्या रचलेल्या भिंतीवर सिंहासनाधिस्त झाला आहे.
चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात 3 मीटर व्यासाचे एक नेढे आढळते जसे रतन गडावर आहे त्याच प्रकारचे.
या खडकालाच 'हत्तीप्रस्तर'असेहि म्हणतात. म्हणजे सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्यावरून जर चिलखती बुरुजाकडे पहिले तर तो हत्ती असल्याचा भास होतो. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडन पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात आहे. राजगड नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांनी वेढलेला आहे.सुवेळा माचीच्या उजव्या अंगास त्या पर्वतीय कोंदणात नदीचं पात्र उन्हामध्ये तळपताना दिसते.
बाजू एक अशीही तशीही..... माझी कैक पटीने बरीही....
संस्काराचा खेळ सारा....समाधानात सुख जरी दुखःही....
सूर्य माथ्यावरून खाली उतरण्यास सुरवात झाली, दुपारचा एक वाजला. सकाळी सात वाजेपासून आमची ऐतिहासिक वाटांवरून पायपीट चालू होती. थकवा जाणवला नाही पण पोटात कावळे मात्र कावले होते. आमच्यासाठी नाही पण निदान त्यांच्यासाठी आम्हाला भोजन करावं लागणार होते. अखेर आम्ही पुन्हा पद्मावती माचीचा रस्ता धरला. वाटेत आम्हाला बारा वर्षाचा होतकरू मुलगा भेटला. हातात एक गोन. त्यामधे ताक, पाणी, लिंबूसरबत हे सारं घेऊन वणवण करत हिंडत होता. आम्हालाही बराच आग्रह केला त्याने. कि तुम्ही निदान ताक तरी घ्यावं. मग आम्हीही त्याला सोबतच घेऊनच खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्याची चौकशी केली तेव्हा कळलं कि सातवीत शिकणारा अत्यंत हुशार ,मेहनती आणि जिद्दी मुलगा. दीपक नाव त्याचं. ज्याला राजगडाची खडा न खडा माहिती. पुढे मोठा पोलिस अधिकारी व्हाव हे त्याचे स्वप्न. सातवी मधे शिकत असूनहि रविवारी आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून पाणी, ताक, लींबु सरबत घेऊन पालिहून गडावर पायपीट करत येतो. जेणेकरून ते आपल्याकडून विकलं जाईल. रविवारची सुट्टी फळाला येईल, दोन पैसे खर्चासाठी सुटतील. तेवडीच आपल्या आईवडिलांना मदत होईल. खाण तशी माती म्हणतात ती अशी...विशेष म्हणजे आज त्यांच्या शाळेत गॅदरिंग. त्यात त्याने भाग घेतलेला. एक महाराजांचा पोवाडा, तर दुसरं खंडोबाचं गीत नृत्य. त्याचे वडील छोटेखानी शाहीर...बघा कसले संस्कार आहेत. नाहीतर आपल्याकडची मुलं...तुलना करा फक्त...बाकी आपण काहीही करू शकत नाही. मुळात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी..असो....आपल्या शिवप्रेमी गडयात्री समुहतर्फे त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.. आणि त्याच्या ह्या जिद्दीला मानाचा मुजरा
दीपक आणि वाटाड्या काकांच्या संगतीनेच आम्ही जेवणाचा कार्यक्रम उरकला. पाककलेत समृद्ध असलेल्या तब्बल सव्वीस कुकनी जो स्वाद डब्यात बंदिस्त करून दिला होता त्याला मोकळीक दिली आणि उदराचा रस्ता दाखवला. त्या आस्वादानेच सारे तृप्त झाले. आता पावणेतीन वाजले होते. वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. सर्वाना पुन्हा प्रस्तावित करण्यात आलं. गड आम्ही जरी चोर दरवाज्याने चढले असू तरी उतरतेवेळेस मात्र पाली दरवाज्याने उतरणार होतो.काकांना बस गुंजवनेहून पाली गावात आणण्यासाठी रवाना केले आणि आम्ही दीपक सोबत गडाची माहिती घेत पाली दरवाजा गाठला. तत्पूर्वी संजीवनी माची. संजीवनी माचीवर येण्यासाठी अळु दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग यादरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा 3 टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. या माचीला एकूण 19 बुरुज आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. वेळे अभावी संजीवनी माची वर जाणे जरी टाळले असले तरी दिपकचं मार्गदर्शन आणि माचीची भव्य उत्कृष्ट अशी ताटबंदीच भुरळ पडणारी आहे. पावसाळ्यात या गडाचं सौंदर्य डोळ्यात मावणार नाही हे मात्र नक्की.
पाली दरवाज्यातून बालेकिल्ला, संजीवनी माची आणि तोरणा न्याहाळताना आपले पाय जागचे हालत नाहीत.त्यांना रेटून पुढे धकालावं लागतं. पालीगावात जाण्याचा मार्ग पाली दरवाजातून जातो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्या उतरण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत.पायर्यांची उंची दमछाक करणारी आहे. उरतावेळेस पहिल्या प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवड्याआहेत. ते प्रवेशद्वार ओलांडून खाली 200 मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. हे भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. गडाच्या प्रत्येक टप्प्यांवर केलेली प्रतिकाराची रचना तसेच प्रत्येक दरवाजा तसेच बुरुजाला मागाहून दिलेले दुहेरी संरक्षण हे राजगडच्या वास्तुंचे मह्त्वाचे वैशिष्ट्य! महाद्वाराच्या आत एक दुर्बोध शिलालेख दिसतो.
भरभक्कम कोंडिव्यूह रचना .... राजगड पाली द्वार.....
गज अंबारी सहित यावा.....दुहेरी संरक्षित भव्य द्वार....
आमची मात्र उतरताना दमछाक झाली पालिमार्गाच्या मानाने गुंजवणे मार्ग सोईस्कर वाटला. पायथ्याशी उतरून मागे वळून पाहिलं तर अजूनही काहीतरी शेष राहिलंय अस वाटलं राजगडावर काहीतरी मिस केलंय.... नक्कीच तो हिरवा शालू नेसलेला राजगड.... सुवेळा संजीवनी माची....बालेकिल्ल्याच्या एकेरी रस्त्यावरून ओघळणारे पाणि आणि त्यातून तो सर करण्याचा थरार.... ओसंडून वाहणारा पद्मावती तलाव....असं बरंच काही. पायथ्याशी उतरलो कि एक अर्धा किमी रस्त्यावर वेथभर धुळीचा खस पडलेला आढळतो. गडावर दुरुस्तीचे काम चालू असल्याने वाहनांच्या आवागमनामुळे असेल पण त्या धुळीत चालताना सर्यांचाच पारा चढला होता. आम्ही सोडून बाकीहि शिवप्रेमी गडावर भरपूर होते. काही तर रात्री मुक्कामी देखील होते.
खाली पायथ्याशी पाली गावात आमची बस येऊन थांबली होती.सारेच आसनस्थ झालो आणि पाच वाजता बसने परतीचा मार्ग धरला. मधेच पुण्यात गाडीची तहान आणि आमची चहाची तळप पूर्ण करून हो नाय करत करत दहा वाजता लोणावळ्यात जेवणासाठी थांबलो. जेवण होईस्तोवर मनिषने टाईमपास आणि कॉल्डड्रिंक्स आणली त्याचा आस्वाद घेऊन जेवण उरकलं. कोणाला घ्यायची त्याने चिक्की, चॉकलेट्स घेतली आणि पुन्हा अकरा वाजता बस मार्गस्थ झाली ती थेट घरीच येऊन थांबली. बसमध्येच नवीन सदस्यांचे अभिप्राय जाणून घेतले. एकंदरीतच सारे उत्साही, आनंदी होते. काही नवीन मुद्दे हि पुढे आले त्याचाही विचार पुढच्या ट्रेक ला निश्चितच केला जाईल. शेवटी चांगलं ते चांगलच असतं. माणसाने या जगात जर सुखात जगायचं असेल तर चांगले विचार, चांगले आचरण, आणि आहे त्यात समाधान मानून राहावे...
जगदंबेची कृपा.... आमचा छंद वेगळा....
किल्ले पाहणे मुळात पोरखेळ नाही. निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने जरी किल्ल्याकडे पाहायचं म्हंटल तरी अशी हि रोमहर्षक, अशी हि चैतन्यमय, असगी हि विसरून टाकणारी, अशी हि तरूणाईस हाक घालणारी स्मृतिस्थळे शोधून सापडायची नाहीत. किल्ल्यावरून दिसनारे सूर्योदय आणि सूर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे. किल्ल्यावरून रात्री पडणारे नक्षत्र दर्शन, हा अवर्णनीय आनंद आहे. त्याची कशाचीच तुलना करता यायची नाही.
संसारिक व्यापापासून मन मुक्त होतं. रणावनातील पशुपक्षांशी मैत्र जुळतं. स्वच्छ भराट वारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं. वाढतं वय तिथेच थांबतं. ते माघारी वळतं. पाच दहा वर्षांनी तरुण झालो आहोत असा साक्षात्कार होतो. नाना समस्यांची खच्चून भरलेल्या , कळंजून गेलेल्या जीवनातुन काही क्षण जरी बाजूस काढून जे ऐतिहासिक स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी जातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे तरी काय वेगळं असतं ...!!
कैसे बोलणे चालणे सलगी देणारे शिवराय कैसे
सह्याद्री तटा बुराजांनी अनुभवले शिवराय कैसे
वाचा फुटावी तटा बुरुजांना येऊन कानी सांगावे
अंगा खांद्यावर खेळले तुमच्या ते शिवराय कैसे
रोमहर्षक चैतन्यमय असे तटा बुराजांचे किल्ले
स्मृतीस्थळानो जागेच तुम्ही सांगा शिवराय कैसे
अपूर्व दृश्य ठेउनी लक्ष असती सूर्योदय सूर्यास्त
रात्रीच्या उदरातील नक्षत्रानो सांगा शिवराय कैसे
मैल तीनशे लांबीची पर्वत शृंखला असे सह्याद्री
साज साडे तीनशेकिल्ल्यानो सांगा शिवराय कैसे
वखानते जनता सारी जरी गुणगौरविते त्यांसी
परी वागते विपरीत नाही ओळखले शिवराय कैसे
..........नितेश पाटील
राजगडावरील आजही या तीन माच्या, बालेकिल्ला, बुरुज, भग्नावस्थेतील अवशेष शिवरायांची प्रेरणा देणारे स्पूर्तीचे जिवंत झरे आहेत.
खाली पायथ्याशी पाली गावात आमची बस येऊन थांबली होती.सारेच आसनस्थ झालो आणि पाच वाजता बसने परतीचा मार्ग धरला. मधेच पुण्यात गाडीची तहान आणि आमची चहाची तळप पूर्ण करून हो नाय करत करत दहा वाजता लोणावळ्यात जेवणासाठी थांबलो. जेवण होईस्तोवर मनिषने टाईमपास आणि कॉल्डड्रिंक्स आणली त्याचा आस्वाद घेऊन जेवण उरकलं. कोणाला घ्यायची त्याने चिक्की, चॉकलेट्स घेतली आणि पुन्हा अकरा वाजता बस मार्गस्थ झाली ती थेट घरीच येऊन थांबली. बसमध्येच नवीन सदस्यांचे अभिप्राय जाणून घेतले. एकंदरीतच सारे उत्साही, आनंदी होते. काही नवीन मुद्दे हि पुढे आले त्याचाही विचार पुढच्या ट्रेक ला निश्चितच केला जाईल. शेवटी चांगलं ते चांगलच असतं. माणसाने या जगात जर सुखात जगायचं असेल तर चांगले विचार, चांगले आचरण, आणि आहे त्यात समाधान मानून राहावे...
जगदंबेची कृपा.... आमचा छंद वेगळा....
व्हावे शिवचरित्राचे आचरण.... हाती ध्वज भगवा.....
इतिहासकारांचे दुर्गप्रेमींना सांगणे आहे. इतिहास प्रकाश दीप आहे. उणेपुरे सर्व स्वच्छ दाखविणारा, काय त्याजले पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, हे आपलं आपणच ठरवायचे असते. " शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे ते तटाबुरुजांनी अनुभवलं असणार !
या तटाबुरजांना जर वाचा फुटली तर हे आपल्या कानी कुजबुजत...म्हणतील, "होय गड्यानो तो पवित्र आत्मा आम्ही कोणे एके काळी आमच्या अंगाखांद्यावर गाजविला आहे. याची देही ,याची डोळा अनुभवला आहे. आणि आजही तो इथे जिवंत आहे.किल्ले पाहणे मुळात पोरखेळ नाही. निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने जरी किल्ल्याकडे पाहायचं म्हंटल तरी अशी हि रोमहर्षक, अशी हि चैतन्यमय, असगी हि विसरून टाकणारी, अशी हि तरूणाईस हाक घालणारी स्मृतिस्थळे शोधून सापडायची नाहीत. किल्ल्यावरून दिसनारे सूर्योदय आणि सूर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे. किल्ल्यावरून रात्री पडणारे नक्षत्र दर्शन, हा अवर्णनीय आनंद आहे. त्याची कशाचीच तुलना करता यायची नाही.
संसारिक व्यापापासून मन मुक्त होतं. रणावनातील पशुपक्षांशी मैत्र जुळतं. स्वच्छ भराट वारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं. वाढतं वय तिथेच थांबतं. ते माघारी वळतं. पाच दहा वर्षांनी तरुण झालो आहोत असा साक्षात्कार होतो. नाना समस्यांची खच्चून भरलेल्या , कळंजून गेलेल्या जीवनातुन काही क्षण जरी बाजूस काढून जे ऐतिहासिक स्मृतिस्थळाच्या दर्शनासाठी जातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे तरी काय वेगळं असतं ...!!
कैसे बोलणे चालणे सलगी देणारे शिवराय कैसे
सह्याद्री तटा बुराजांनी अनुभवले शिवराय कैसे
वाचा फुटावी तटा बुरुजांना येऊन कानी सांगावे
अंगा खांद्यावर खेळले तुमच्या ते शिवराय कैसे
रोमहर्षक चैतन्यमय असे तटा बुराजांचे किल्ले
स्मृतीस्थळानो जागेच तुम्ही सांगा शिवराय कैसे
अपूर्व दृश्य ठेउनी लक्ष असती सूर्योदय सूर्यास्त
रात्रीच्या उदरातील नक्षत्रानो सांगा शिवराय कैसे
मैल तीनशे लांबीची पर्वत शृंखला असे सह्याद्री
साज साडे तीनशेकिल्ल्यानो सांगा शिवराय कैसे
वखानते जनता सारी जरी गुणगौरविते त्यांसी
परी वागते विपरीत नाही ओळखले शिवराय कैसे
..........नितेश पाटील
राजगडावरील आजही या तीन माच्या, बालेकिल्ला, बुरुज, भग्नावस्थेतील अवशेष शिवरायांची प्रेरणा देणारे स्पूर्तीचे जिवंत झरे आहेत.
आपला अभिप्राय नक्की कळवा....
|| जय शिवराय ||
|| जय शिवराय ||
आपल्याला राजगड पर्यटनाला लाख लाख शुभेच्छा
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com